एक पान ...
कूठल्या तरी वाटेने तु येत होता ,
भरल्यां डोळ्यांनी मज निरोप देत होता ...
पान एक शेवटी फांदी धरून ,
साजंवारा तया सोबत गूणगूणत होता ...
उरलेला त्राण त्या देठात ओतून ,
एकांतात आठवांचा उत्सव होता ...
कुणी जाळले निखारे वृक्ष पायथ्याशी ,
झूंज अखेरची धुरा सवे देत होता...
वाट होती तयाला येईल वसंत ,
झडलेल्या पालव्यांना खुणावीत होता ...
आस ना सोडली त्यांने शेवटपर्यंत ,
तो शेवटी गळला तेव्हा पानांना बहर होता ...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा