पोस्ट्स

मे, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

चेतावणी...

  अशी घाई करू नको ना मना , सांभाळ जरा स्वतःला मना... वळण ही निखारे विखारी , पोखरून निघे तुझे पाय मना ... चेतावणी तुला पहिलेच माझी, आसवांनी सुरू ही कहाणी मना... नदीत बुडाले कुणी या नादात, नाव मोठे होई तरी विरहच मना ... नको हा रस्ता नको ही वळणे , आताच थांब समोर ना थांबा मना... बघतच तुला रात्र होते उषाही अशीच, नावी तुझ्या जीवण सारे केले मना... चंचल तू सुगंध सोनचाफ्याचा , मोहून घेतलेस आता हाल विरातोय मना... अशी घाई करू नको ना मना , सांभाळ जरा स्वतःला मना...

गुन्हेगार मी तुझा...

  कुंद कुंद या श्वासांची , वाट मोकळी होई ना , हृदयात साठलेल्या क्षणांचे , निचरून पाणी वाहे ना , अपराध माझा घोर झाला , मनास तुझ्या मी तोडले , गुन्हेगार मी तुझा कधीचा , ओझे हे डोळ्यांत वाहणे ... थांबव कसा हा जीवघेणा प्रवास , मनात चाले घालमेल , हात तुझा हाती ना राहला , तुझ्याशिवाय या जीवनाचा , अर्थ ही हरवला ... संपवून सगळे जिंकलो मी , जिंकुनही कसा जीव घाबरला , तूच हवीस मजला , शब्दं शब्द गहीवरला , हुंदका दाटून म्हणतो , स्वरांत सूर तुझा मिळव ना ... ये ना तू पुन्हा जीवनात माझ्या ये ना , थांबलेल्या स्पंदनाना आयूष्य दे ना ... कुंद कुंद या श्वासांची , वाट मोकळी होई ना , हृदयात साठलेल्या क्षणांचे , निचरून पाणी वाहे ना , अपराध माझा घोर झाला , मनास तुझ्या मी तोडले , गुन्हेगार मी तुझा कधीचा , ओझे हे डोळ्यांत वाहणे ...

चक्रव्यूह ...

  असंख्य विचारांचे जाळे , डोक्याभोवती विणलेले , चमकणाऱ्यां तारांना गुरफटून ,मी किडा अडकलेले ... सारता बाजूला एक एक तार , पून्हा विस्कटलेले , मार्ग निघता निघत नाही, पुन्हा गहरी अडकलेले ... डोळे मिटता थैमान घालते , शब्द विचार झालेले , चक्रव्युह यांनी रचलेला , आरोपात मी अडकलेले ... अभिमन्यूने ऐकले फक्त , चक्रव्यूहात कसे शिरलेले , लढून गेला तो विर तिथे , मी आपल्याच भोवती अडकलेले... पटतेय का ? तुम्हाला , किती भयावह विचारांची गर्दी , कोणी जीव दिलेले , कुणी वाट अडखडत अडकलेले ...

तगमग...

  तगमग या मनाची तु जाणशील का ? तुझ्याशीवाय मला अर्थ नाही मानशील का ?... काळ्यांडोळया मागे जेव्हा अंधार दाटतो , तूच असतो सोबतीला चालत जाणशील का?... चांदणे हसते जेव्हा तुझ्या मुखी गोड प्रिया, तुझ्याशिवाय तारांगणे ही फिकी मानशील का?... प्रित पिवळ्या सोन्यांची नक्षी करून घेतली, तूलाच चढविले अलंकारात जाणशील का?... हिरवागार बहरलां तो स्वप्नांचा बगीचा , हात घेऊन माझा सवे मोगर्‍यापरी दरवळशील का?... मोती रोमरोमी बहरले झळाळी तनुवर आली , पांघरून ही झळाळी स्वप्न माझे पाहशील का?... गुलाबाने रंग सजले जीवन रंगीत झाले माझे, रंगलेल्या पाऊलवाटा माझ्यावाटे सवे चालशील का?...

निर्जीव ...

  कधी बहरला तो वृक्ष पाना फुलांनी डवरला , सरीसोबत भीजला वाऱ्यासवे बेधुंद झुलला... कधी किलबील पक्षांची ऐकता खट्याळ झाला, उडवता फांदीवरून एका अलगद पानांचा आधार दिला... सावली ती गार घनदाट फक्त त्यांच्याजवळ होती, विसावले किती त्याखाली पण नाश त्यांचाच केला... तो देत राहीला निरंतर मनाच्या गाभाऱ्यांतून सर्वां , कपुत कशे निपजले ओरबडून त्यांचाच घात केला... नातं जे प्रेमाने विश्वासाने त्याने जपले निस्वार्थ , निर्जीव मनाला करून उन्हांत ऐकटाच करपला ...

आभास...

 गडद काळ्या रात्रीचा तो लख्ख सोनेरी स्पर्श जाते जागवुनी, चंद्र डोकावे खिडकीतून वाऱ्यास लाजून पणती घेते झाकूनी ... मृगजळ लागले पाठी इथे छळते दिवसरात्र हा आभास तुझा , मेघाशी कट्टी केली तरी बरसतो तो लाजून माझ्याच अंगणी ... नैन बोलते आता आरश्यात माझ्याच तुला बघून प्रतीबिंबाशी, मी ,मी ना राहले सख्या ने मज डोलीत सनई चौघडे वाजवूनी... नाही साभांळत मन दूर तू तरी जवळ का ? भासतो मजला, तुझ्या दिशेने येणाऱ्या वाऱ्यासवे मन बेधूंद होते भान हरपूनी... ये ना माझ्याजवळ सख्या आतूर हरणी तुझीच वाट पाहते, चातकाची तहान माझी बरस श्रावणा मृदूगंध श्वासात भरूनी...

वेदना...

  मनास घायाळ करून वेदना विरत चालली आहे , रक्तबंबाळ मनाची आरोळी हवेत विरत चालली आहे ... पावलांना पावलांची झळ पोहोचली चालता चालता , रेतीत सोबतीला रूतणारे पदचिन्ह विरत चालली आहे ... अंधुक त्या वळणावर कोण लपून बसला होता , वार होता अचानक आरशातले प्रतिबिंब विरत चालली आहे ... क्षण सुखाचा जगला होता दोघांनी दुनियेस लपून , ओंजळीत लपलेल्या आठवांच्या छटा विरत चालली आहे ... शांत मनसागरात कसा कोणी खडा आठवणीचा मारला , वलय वलयात मिसळून तरंग मनीचे विरत चालली आहे ...

प्रेमाची परिभाषा...

  प्रेमाची परिभाषा हीच ती पारीजातकापरी फुलांवी, अंगणात माझ्या तरी तुझ्या दारी सुगंध शिंपीत गंधाळावी... नको बांधूस तु तिला व्याख्या का ? तूला कळावी , अबोल बोलकी भाषा ही माया लागता पशूलाही कळावी... हर्ष मनाचा ओठांवर हास्याची लकेर संसर्गजन्यपरी पसरावी, क्षणोक्षणी बहरत जाणारा आनंद नदीपरी ओसंडून वहावी ... प्रेमाची नसे कोणतीच परिभाषा ही मनाची मनाला कळावी, प्रेमच ओजंळीत वेचून आनंदात आसमंती ही उधळावी ... श्रावणासोबती बेधूंद बरसावी मन भिजून ओलीचिंब व्हावी, तुझ्या ओंजळीत भरून परत निसटून दुसऱ्यांस मिळावी ...

तुझ्याचसाठी प्रिये...

  दिसता त्या आडोश्याला तु क्षण सुंदर जाहला , तुझ्याचसाठी प्रिये माझ्यात मी मनाने गंधर्वं पाहला ... नाजूक हातात अदेने घेत साजूक तुपाची फळी , तुझ्याचसाठी प्रिये माझ्या मनाचा जीव आटला... लक्षवेधी लहंग्याला चमचमणाऱ्या त्या तारंका, तुझ्याचसाठी प्रिये माझ्या मनाचा चंद्र मातला ... रेशमी लटेची कुरळी समोर आलेली बट जिव्हारी, तुझ्याचसाठी प्रिये वाऱ्यापरी मनाची हुरहूर साहला... ती सूर्याला ग्रहण लावणारी झलक तुझी कातील , तुझ्याचसाठी प्रिये मी तूळसपत्रपरी गेलो वाटला... दिसता त्या आडोश्याला तु क्षण सुंदर जाहला , तुझ्याचसाठी प्रिये माझ्यात मी मनाने गंधर्वं पाहला ...

दोष कुणाचा ...

  आघात केला मनावर घाव घालू कसा , दोष कुणाचा विचारतोस पुन्हा घाव घालतेस कसा ... हिमालयावर बर्फ आच्छादला तरी उदरी लावा , आग उदराची विझवण्या सांग घाव घालतेस कसा ... भेटला तो गुलमोहर दारात उभा जो हात जोडून , बहरलेल्या फांद्यांनाही छाटल्या घाव घालतेस कसा ... पाण्यात शांततेची फक्त चाहूलच होती दिसत वलयांची सुटाया लागली साथ घाव घालतेस कसा ... मज तिन्हाईतच समज मी तुझ्या उपयोगी नाही , माझ्या मनाचे तुकडे करण्या घाव घालतेस कसा ... डोळ्यासमोर नको राहू उभा जरी दिसला तू पण तुलाच पाहण्या आघात झेलते घाव घालतेस कसा ...

मनाचा दिवा...

  त्याला पाहताच तेवला मनाचा दिवा , फडफडतो तू ओझर होता मनाचा दिवा ... तेल प्रेमाचे ओतले काठोकाठ भरले तुडुंब , निरंतर अखंड देव्हाऱ्यात ठेवला मनाचा दिवा... आनंद होत नाही का तुला पाहुन दिवा माझा, प्रेमाने ओलावते वात लख्ख प्रकाशमय मनाचा दिवा... वाऱ्याशी लढतो पुन्हा तेवतो स्थिर राहतो बघ, प्रेमाची विश्वासाची नाती जपतो मनाचा दिवा... सकारात्मक ऊर्जेचा विश्वास उत्साहाची लाट , भक्तिमय जीवन अध्यात्माचा राग मनाचा दिवा ...

आरशाची खोली ...

  न्याहाळता रूप आरशात दिसते मजला मुक मनाचे रूप , गहरी खोली आरशाची बघून भावनाही जाणून लपवते रूप ... बोलक्या क्षणांच्या गाठीभेटी कधी  आता बंद कवाडे , अदृश्य मनाचे क्षण बोलके आरशात जपते आरसपाणी रूप ... बोलू पाहते कितीदा ओठात शब्द घेऊन थांबतात बघ , किती केल्या विनवण्या मनाच्या दाखवू नको तू खरं रूप ... मन ऐकत नाही माझं करते हतबल संभ्रमात पाडते , नाही म्हणून पाहता त्याला मन दर्पणात हसून निखरते रूप... तू असाच जीवनात आला जीवन माझेच तू झाला , या वळणावर जगण्यासाठी मागते मागणे तुलाच तुझे रूप ...

धोका...

  कुरवाळून जखमांना विचारले , असे का तळमळले , सर्वस्व मानले ज्यास , त्याने झिडकारता भाव तळमळले ... धोकाधडीचा आरोप , मज स्वप्नावर मन आक्रंदले , आठवून सोबतीच्या क्षणांना , आठवांच्या राती तळमळले ... नको ना फासू काळीमा , प्रितीवर माझ्या प्रिया , मन हरता प्रेम हरले ,मनातल्या प्रीतीचे तार तळमळले ... कुठे जाणले मी  ,तुझ्या अशा वागण्याला पहिले , विचारते मला दुनिया , भ्रमिष्ट भासाच्या श्रद्धेसाठी तळमळले ... प्रेमच होता शाप जगण्याचा, जीवनाचे कसे हसे झाले , मनाने ही डोळे मिटून घेतले ,अंतरंगाचे श्वास तळमळले ...

राजे...

  आईच्या गर्भात राजे सज्ज झाले , जीजाऊ उदरी बघा स्वराज्य स्थापक आले ... प्रजेसाठी झटले प्राण पणाला लावून , पाहून पताका मराठीची शत्रूही शरण आले ... रुबाबदार राजे माझे मन जिंकून गेले , घराघरांत बोले मनात छत्रपती शिवाजी आले ... झेंडा मराठी बाणा मराठी मराठी मायबोली , मराठीच्या उद्धारासाठीच राजे शिवाजी आले... मृत्यु राजांचा होता शत्रुचे मनही हळहळले , शिवा जिंकून गेला जग शत्रूही ओवाळाला आले ... युगंधर पुरुष हे युगांयुगे अमर जाहले , पृथ्वीवरचे चमत्कार हे पिढ्यांपिढीला मार्ग आले ...

सावल्यांही सोडून गेल्या...

 परतल्या पावलांच्या निशाण्या सावल्याही सोडून गेल्या , क्षणात उडता पाखरे आठवांचे  सावल्याही सोडून गेल्या ... रेतीत बंगला बांधलेला सख्या विरून गेला तेव्हाच , विश्वासाची हत्या करताच प्रेमाच्या सावल्याही सोडून गेल्या... मन धावत होते वाटेवर तुझ्या वाटच हरवली इथे , डोळे भिरभीर शोधते जरी तुझ्या सावल्यांही सोडून गेल्या... ऐकु येता गुंज सनई चौघड्यांची मन तिथेच थांबते, पाहिले स्वप्न मिळून त्या स्वप्नांच्या सावल्यांही सोडून गेल्या... उरले ना त्राण काही मनात मन असे निर्जीव झाले , मन आडोश्याला शोधते अजून ज्या सावल्यांही सोडून गेल्या...

तु एक बिंदू...

  विशाल धरेच्या पात्रातला तु एक बिंदू , मी मी करून हिनवतेस स्वतःला तु एक बिंदू ... आसमंत पांघरूण घालतो समावून चंद्र सूर्य सारे, तू कोण आहेस ? सांगना तु एक बिंदू ... समुद्र तो पाण्याने लबलबलेला तरी शुद्र , नदी ती धावती तृप्त करी तू सांग तू एक बिंदू ... वृक्षवल्ली फूलांकित श्वास देई जीवनाला , श्वास घेता श्वासांत श्वास येते तुझ्या बोल तु एक बिंदू ... बघ इथे चौफेर श्रावण म्हणतो का? मी , तु अधिर मन सावर कारण फक्त तु एक बिंदू ...

का ? मतभेद होते ...

  मतांनी मतांशी केलेले भेद का? मतभेद होते , अहो कळेना मला बोलता जरा खटकले का? मतभेद होते ... पाचही बोटांची उंची मोजली तेव्हा कळले , तफावत विचारांची खोल असली  का? मतभेद होते ... गंमत असते थोडीशी जेव्हा ऐकमेकांचे ना पटे , दोन बाजू तरी नाण्याच्या किंमतीचे का? मतभेद होते ... जीवनाची नाव समुद्रात सोडून दिली खलाश्यांने , वाहवत कुठे नेणार नियती सांगा यात का ? मतभेद होते... भेद हा असणार म्हणूनच विवीधता नांदते सुखाने, मनमुटाव संवादाचे असले की हतबल का? मतभेद होते ...

जीवनाची कविता ...

 जीवनाची कविता ... अक्षरांचे शब्दं होते भावनेला स्पर्शुन जाते, वाचतांना या फुलांना डोळ्यांतून मनस्पर्श हसते ... अलगद सांडतात मग पापण्यातून शब्दं , गालावर ओघळतांना खळीतून हळूच मनात विरते... चांदण्याचा चुरा करून पाचूच्या वनात शिंपते , क्षितीजापलीकडे रंगवते स्वतःला सांजेच्या कुशीत शिरते ... मलाच आठवायचे होते का? तुला का? दूसरे कुणी , क्षणभर भांबावते थोडेशी हसून गालातच हसते .... शब्द शब्द दाटतात ऊरी गर्दि किती भावनांची, थांबत नाही ना पैलतीरी ऐलतीरावरच भरगच्च दाटते... जीवनाची कविता ही अशीच अपूर्णात पूर्णत्व भरते, लिहीतां लिहीतां राहते काही नकळत लिहील्या जाते...